Skip to main content

'लोकमान्य' अण्णा हजारे.

प्रकाशीत विभाग
मजकूर: 

सद्ध्या देशातिल जनतेच श्रद्धास्थान व जननेते श्री.किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा हजारे याना आम्ही व 'वार्ताहर नारदवाणी, पालघर मधील साप्ताहीक'परिवारातर्फे 'लोकमान्य' हा किताब बहाल करित आहोत.
ज्याप्रमाणे महात्मा गान्धीनी व लोकमान्य टिळकानी दुराचारी व हेकेखोर ब्रिटीशाना सत्य व अहिन्साच्या मार्गाने वठणीवर आणल,अगदी त्याच प्रमाणे अण्णा केन्द्र सरकार व खास करुन कोन्ग्रेसला भ्रष्टाचार व दुराचारा पासुन वठणीवर आणायला निघाले आहेत. व वठणीवर आणणार याची आमच्या मनात तरी शन्का नाही.
ही स्वातन्त्र्याची दुसरी लढाई आहे.येथे माघार घेऊन चालणार नाही. शत्रू मोकाट आहे.त्याला सत्तेची व पैशाची नशा चढली आहे. ब्रिटीशा प्रमाणेच ते जनतेचा आवाज दडपू पाहत आहेत. पण आता जनता जाग्रुत झाली आहे,तरुण जागा झाला आहे.देशाचे हित कशात आहे हे त्याला कळते.
ते असो! हे पुन्हा कधीतरी! आजपासुन आपण सगळेजण अण्णाना,लोकमान्य अण्णा हजारे म्हणू या.

सर्व मराठी जनांसाठी....... मराठी जानणार्‍या सर्वांसाठी....
या संकेत स्थळावर व्यक्त केलेली मतं ही त्या त्या लेखकांची व्यक्तिगत असुन मराठी दर्पण त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.